राजामौलींच्या 1000 कोटींच्या चित्रपटात होणार आमिर खानची एन्ट्री? झाली सिक्रेट मिटिंग
लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यापासून आमिर खान मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याने अद्याप एकही चित्रपट साइन केलेला नाही. पण आता बातमी येत आहे की, आमिर खान दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटाचा भाग बनू शकतो. वास्तविक, राजामौली आणि महेश बाबूच्या पुढील चित्रपटात आमिर खलनायक बनू शकतो, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
123 तेलुगुच्या रिपोर्टनुसार, बाहुबली फेम दिग्दर्शक राजामौली आणि आमिर खान यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत एक सिक्रेट मिटिंग झाली होती. दोघांच्या या गुप्त भेटीनंतर पुन्हा ही भेट राजामौली आणि महेश बाबू यांच्या SSMB29 साठी होती, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही.
एसएसएमबी 29 मधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी राजामौली यांनी आमिर खानशी संपर्क साधल्याचे वृत्तात म्हटले जात आहे. जर ही बातमी खरी असेल आणि आमिर या प्रोजेक्टचा भाग बनला, तर चाहत्यांनी आणखी एका मोठ्या चित्रपटासाठी सज्ज व्हावे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे देशातील सर्वात महागडे चित्रपट म्हणून वर्णन केले जात आहे. त्याचे बजेट सुमारे 1000 कोटी रुपये असणार आहे.
आमिर राजामौलीच्या चित्रपटाचा भाग असेल की नाही, हे येणारा काळच सांगेल, पण अलीकडच्या काळात असे अनेक स्टार्स आहेत, जे साऊथमधून बॉलीवूड आणि बॉलिवूडमधून साऊथ चित्रपटसृष्टीत गेले आहेत. ज्युनियर एनटीआर ऋतिक रोशनच्या वॉर 2 मध्ये दिसणार आहे. जान्हवी कपूर आणि कियारा अडवाणी ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत काम करत आहेत. याशिवाय संजय दत्तने अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. ही यादी दिवसेंदिवस मोठी होत आहे.
The post राजामौलींच्या 1000 कोटींच्या चित्रपटात होणार आमिर खानची एन्ट्री? झाली सिक्रेट मिटिंग appeared first on Majha Paper.
READ ON APP