Hero Image

Rabindranath Tagore Jayanti 2024 Wishes: रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना द्या शुभेच्छा

Rabindranath Tagore Powerful Quotes, Famous Slogans and Thoughts by Rabindranath Tagore in Marathi: रवींद्रनाथ टागोर जयंती 8 मे रोजी साजरी केली जाते. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore Jayanti Wishes) साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. ते प्रसिद्ध कादंबरीकार, कवी, लेखक, नाटककार, संगीतकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि चित्रकार होते.

भारतीय राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore Jayanti) हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. यंदा त्यांची 163वी जयंती साजरी होत आहे. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना हे शुभेच्छा संदेश आणि टागोर यांचे विचार पाठवून शुभेच्छा देऊ शकता.



'मी एक आशावादी व्यक्ती आहे. मी ध्येय्यापर्यंत एका दारानं पोहोचू शकलो नाही, तर दुसऱ्या दाराचा वापर करेन अथवा एक नवा दरवाजा तयार करेन.'

आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.



माणुसकी असेल तर तुम्ही कोणतंही यश सहज संपादन करू शकता.

'तथ्य कैक आहेत. पण, सत्य एकच आहे. तुम्हीही सर्व चुकांसाठी दारं बंद केलात तर, सत्य बाहेर येईलच.'



आपण महानतेच्या सर्वात जवळ तेव्हा असतो जेव्हा आपण नम्रपणात महान असतो.

फुलाच्या पाकळ्या खुडून तुम्ही त्या फुलाची सुंदरता मिळवू शकत नाही.



'अडचणी येऊ नयेत अशी प्रार्थनाच आपण केली नाही पाहिजे. त्यापेक्षा त्यांचा सामना न डगमगता करता यावा यासाठीचं बळ मिळावं अशी प्रार्थना केली पाहिजे.'

आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.




आनंदी राहणं खूप सोपं असत. मात्र, साधेपणा अंगिकारणं कठीण असतं.

'नदीकाठी उभं राहून, पाणी पाहून तुम्ही ती ओलांडू शतच नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरावं लागेल.'



कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.

समुद्रकिनारी उभं राहून पाण्याकडे नुसतं पाहिल्यानं समुद्र पार करता येत नाही.




'भांड्यातलं पाणी चकाकतं, समुद्रातील पाणी मात्र धुसर वाटतं. अगदी तसंच लहानसं सत्य उघडपणे सांगता येतं. पण, महान सत्य मात्र कायमच मौन राहतं.'

प्रेम कधीही अधिकार गाजवत नाही तर ते स्वातंत्र्य देतं.



कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.

READ ON APP