IND v PAK: भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का, थेट ICC नेच केली कडक कारवाई
कोलंबो : भारताने पाकिस्तानला पराभूत करत पहिला धक्का दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण आता थेट आयसीसीनेच कारवाईचा बडगा उचलला आहे.
भारताचा पाकिस्तानवर हा सलग १२ वा विजय ठरला. आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानला तिन्ही सामन्यांत पराभूत केले होते. त्यानंतर आता महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली.पण सामना संपल्यावर आता पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण आता थेट आयसीसीनेच त्यांच्यावर कारवाई केली आहे.
ही गोष्ट घडली ती ४० व्या षटकात. भारताची स्नेह राणा यावेळी गोलंदाजी करत होती. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान भारताने दिले होते. भारत यावेळी सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण त्यावेळी सिदरा अमीन भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर ठरत होती. अमीनने यावेळी अर्धशतक तर झळकावले होते, पण त्यानंतरही ती दमदार फलंदाजी करत होती. अमीनला बाद करण्याची रणनिती हरमनप्रीतने आखली आणि त्यामध्ये तिला यश आले.स्नेहने एक थोडा संथ चेंडू टाकला आणि त्यावर अमीन फसली. अमीन मोठा फटका मारायला गेली आणि तिचा झेल उडाला. हरमनप्रीतने हा झेल पकडला आणि भारत विजयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. पण त्याचवेळी अमीनकडून एक चूक घडली. बाद झाल्यावर अमीनला राग अनावर झाला होता. अमीनने रागाच्या भरात आपली बॅट पीचवर आपटली. मैदान किंवा खेळपट्टीला धोका पोहोचवणे हे आयसीसीच्या नियमांत बसत नाही आणि त्यामुळे ही गोष्ट आयसीसीने अमीनला सांगितली. अमीनने आपली चूक मान्य केली आणि त्यामुळेच तिच्यावर आयसीसीने कारवाई केली.आयसीसीने तिला डीमेरीट पॉइंट दिला आहे, यापुढे अशी चूक पुन्हा केली तर तिच्यावर बंदी येऊ शकते. त्याचबरोबर तिच्या मानधनातील ५० टक्के रक्कम दंडाच्या स्वरुपात कापली जाणार असल्याचे आता समोर आले आहे.
पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना आता अजून एक मोठा धक्का बसला आहे.कारण पुन्हा एकदा त्यांच्या खेळाडूने चूक केली तर तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात येऊ शकते.
भारताचा पाकिस्तानवर हा सलग १२ वा विजय ठरला. आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानला तिन्ही सामन्यांत पराभूत केले होते. त्यानंतर आता महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली.
ही गोष्ट घडली ती ४० व्या षटकात. भारताची स्नेह राणा यावेळी गोलंदाजी करत होती. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान भारताने दिले होते. भारत यावेळी सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण त्यावेळी सिदरा अमीन भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर ठरत होती. अमीनने यावेळी अर्धशतक तर झळकावले होते, पण त्यानंतरही ती दमदार फलंदाजी करत होती. अमीनला बाद करण्याची रणनिती हरमनप्रीतने आखली आणि त्यामध्ये तिला यश आले.
IND vs PAK
पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना आता अजून एक मोठा धक्का बसला आहे.
Next Story