भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं, महाजन -सामंतांनी एकमेकांना भेटणं टाळलं?

राज्यात १७ मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लढवल्या जाण्याऱ्या विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजलं. आणि राज्यात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. १७ पैकी ६ ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाली. जिथे महायुती महाविकास आघाडीला शह देऊ पाहात होती तिथे याच निवडणुकीत महायुतीमध्ये 'ऑल इज वेल' नसल्याचं चित्र दिसलं. आणि याला कारण ठरलं ते म्हणजे नाशिक विधानपरिषद मतदारसंघ आणि महायुतीचे दोन दिग्गज मंत्री – भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजन आणि शिवसेनेचे चाणक्य उदय सामंत! | नाशिकमधील बंडखोरी शमवण्यासाठी हे दोन्ही नेते एकाच दिवशी नाशिकमध्ये दाखल झाले होते. पण, दिवसभरात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटणं पूर्णपणे टाळलं! महायुतीचे दोन मोठे मंत्री एकाच शहरात असूनही एकमेकांना भेटले नाहीत. मग प्रश्न पडतो... महाजन आणि सामंत यांच्यात खरोखरच दुरावा निर्माण झालाय? की यामागे नाशिकच्या बंडखोरीचं कोणतं मोठं राजकीय रहस्य दडलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
Read more